Friday, 31 March 2017

निर्णय घेताना....




आयुष्यात एकदा तरी काही वेडेपणा करावा सर्व काही सुरळीत चालू असताना काही वेगळं करून बघावं  जे आनंद देईल जगणं शिकवल,रोज रोज तेच तेच करुन जगणं ही सामान्य होईल कारण रोज घडणारी घटना सुद्धा "सामान्य घटना" म्हणून अोळखली जाते.
जन्माला येताना भलेही आपण सामान्य असू पण मरताना मात्र मरण" असामान्य" असावं.ज्या आयुष्याकडे बघून  लोकांनीही म्हणावं जगावं तर असलं "जीणं" नाही तर श्वास प्राणी ही घेतात, लौकिक असा मिळवावा जो प्रेरणादायी असेल कुविख्यात तर गुंडही होतात, एखाद्याला उभं करावं कारण पाडणारे तर आपलेही असतात ...
जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं मरतांना श्वास नसेन पण नाव मात्र प्रत्येकाच्या  ह्रदयावर कोरलेले असेल ते जगणं.......
पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासा पर्यंतचा प्रवास म्हणजे काय जगणं !!
जगणं म्हणजे एक संधी खुप काही कमावन्याची मैत्री,नाती , ज्ञान यांचे संकलन करण्याची, अशी संधी मिळुन ही जर आपण फक्त जीभेचे वा शरीराचे चोचले पुरवीन्यासाठीच जगत असु तर अश्या जगण्याला काय अर्थ आहे ?

जगायचंच तर त्या सिंहासारखं जो जगतो स्वतच्या धुंदीत कुणाचीही तमा न बाळगता,जगायचच तर त्या फुलाप्रमाणं जे जगतं एकच दिवस पण सगळ्यांना आपलंसं करूण घेतं, अरे जगणं शिकावं त्या फुलपाखरा कडुन जे फक्त 14 च दिवस जगत पण नेहमी हसत खेळत ,बागडत,आनंद घेत नि आनंद देत ........


©स्वलिखीत 
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

एक वेड.....कर्तुत्वाचं......

असतं एखाद्याला वेड काही वेगळं करण्याचं  प्रवाहाच्या विरूद्ध वाहण्याचं म्हणून काय सगळ्यांनी त्यांना वेडं ठरवायचं ?
 तसं असेल तर आहेच ती लोकं वेडी "ध्येयवेडी", ध्येय प्राप्तीसाठी पिसाटलेली , कुणाचीही पर्वा न करता स्वतःच्या मस्तीत जगणारी, हवं ते करणारी  कदाचीत ते जाणतात, त्यांना वेडं ठरवणारा हाच समाज उद्या त्यांचं गुणगान करताना कधीही थकणार नाही त्यामुळंच ती असं वागतात आणी जींकुन घेतात जगाला आणि जगातील सर्वांच्या ह्रदयालासुद्धा .....

जग जिंकण्यापेक्षा ह्रदय जिंकायला जास्त ताकत लागते .पैशाने भलेही जग विकत घेता येईल पण ह्रदय जींकण्यासाठी अख्ख्ये जीवनही कमी पडते ... म्हणुनच त्यांनी ठरवले पैसा मिळवण्यापेक्षा ह्रदय जिंकायचे आणी झोकून दिले स्वतःला अशा कामात ज्यामध्ये त्यांना आवड होती .....
NASA मध्ये न जाता ISRO ला जगात महत्वाचे स्थान मिळवून देणारे डाॅ . ए पि जे अब्दुल कलाम, पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मुलापासून तर जगावर राज्य करण्याची अपेक्षा पुर्ती करणारे धिरुभाई अंबानी, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढणारे स्वातंत्र्य सेनानी , जीवाची पर्वा न करता स्वराज्य स्थापनेसाठी लढणारे मावळे यांना देखिल वेडातच काढले होते नं !!!
"वेडात मराठे विर दौडले सात ....."
त्यांना वेड्यात काढणारे  जन्माला आलेही आणी गेलेही पण हे वेडेच कायम स्मरणात राहिले माझ्या, तुझ्या ,ह्यांच्या आणि आपल्या सर्वाच्या ....

"आपण जन्माला आलो ते इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला "
ही जाणीव रक्तात उतरवून जगणारी ही ध्येयवेडी पिढी जगाला अोरडून सांगत आहे , पुरातन विचार फक्त वाचनाची वेळ आता संपली आहे,  आता वेळ आहे वाचलेलं जीवन जगण्याची, साचलेली मरगळ झटकण्याची , काहीतरी वेगळं करून दाखवण्याची, आपल्यातल्या कर्तृत्वाला बाहेर काढण्याची आणि संपूर्ण जगातील प्रत्येकाच्या ह्रदयाला जींकण्याची....

©
------स्वलिखीत -------
प्रा. प्रदीप वराडे
(इन्फिनीटी क्लासेस ,अौरंगाबाद)
7588075845

शिक्षक....

शिक्षक

शिक्षकाचाही एखादा
आदर्श शिक्षक असावा
विद्यार्थ्यांच्याच नाही तर
शिक्षकांच्याही मनी बसावा

चुकले जरी कुणाचे
तरी हळूच गाली हसावा
हसवून सारे समजावने
मनी अहं कधी नसावा

पाहताच त्यांना जीवनातला
त्राण सारा सरावा
देहरूपी नसेल तरी
'असा'भावरूपी उरावा

©स्वलिखीत 
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

वडीलांसाठी दोन शब्द.....

*प्रदीप*महाराजांची आज्ञा शिरसावंध्य मानून गंगेशी विवाह करणारे *शंतनू* महाराज , आपल्या पित्याला नागकन्येशी विवाह करता यावा यासाठी ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा करणारे *देवव्रत* जो त्या प्रतिज्ञेमुळे *भीष्म* बनला.
तिन्ही लोकांवर्ती (पृथ्वी,आकाश आणि पातळ) राज्य करणारा *मरुत* राजा ज्याच्या राज्याची इंद्रालाही ईर्ष्या झाली; *तो* घडला केवळ आपल्या पित्याच्या शौर्य आणि संस्कारामुळं,दशरथ राजाने दिलेला *प्राण जाये पण वचन ना जाये* चा संस्कार जगणारे *प्रभूराम*असेल वा स्वतःच्या शौर्याने  सर्वाना दिपवून टाकणारा चक्रवर्ती सम्राट *भरत* (आदिपर्वानुसार दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र) असेल या सर्वांना घडवणारे त्यांचे पिता याना प्रथम अभिवादन ....

संस्कारातून तुमच्या आम्ही नकळत शिकतो चारित्र्यातून तुमच्या आमचे आयुष्य घडवितो ,
जगताना तुम्ही अनेक खस्ता खाल्ल्या पण हार कधी न पत्करली,
हसत खेळत नेहमी आम्हाला नवी दिशा दावली.
*आयुष्य कस असावं ?*
नितळ पाण्यासारख शांत पण खळखळणारं तेजोमय पण चंद्रासारखं शीतल .... एवढं सगळं सांगण्यापेक्षा सरळ *तुमच्यासारखं* असावं .
*स्वतःला दुसर्यापेक्षा नाही तर स्वतःपेक्षा मोठं बनव*
*एक संधी गेली हरकत नाही ती आपल्यासाठी नव्हतीच आपल्यासाठी यापेक्षा भारी संधी तयार होतेय ....*.
हे सांगुण तुम्ही जो आत्मविश्वास वाढवला त्यामुळेच इथपर्यंतचा प्रवास शक्य झालाय....
खूप दिलंत 'पपा तुम्ही आजपर्यंत देतच आलात
"तुम्ही दुःखाची आसवं पिऊन आम्हाला सुखाची नदी दाखवलीत
आम्हाला नेहमीच तुम्ही दिवाळी दिली
ज्यासाठी स्वतःच्या स्वप्नाची होळी केली"
आमच्या साठी एवढं करून कधीच अपेक्षा देखील ठेवली नाही कशाची ! ठेऊन तरी काय! आम्ही तरी काय देवू शकतो ! आवडेल कि नाही माहीत नाही पण प्रयत्न करतोय .....
आमच्या सर्वांकडून छोटीशी भेट.....
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा......

©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

जरा ठरवूया आपण येणाऱ्या पिढ्यांना काय देणार ?

"काय बनून जन्माला यायचं! हे आपल्या हातात नसत पण जन्माला आल्यानंतर काय बनायचं !” हे मात्र आपल्याच हातात असत.
“चिंधी” बनून जन्माला आलेली कन्या आज स्वकर्तुत्वाने “सिंधुताई” (माई) म्हणून ओळखली जाते,विज्ञानातील आधुनिक किरणांचा शोध लावताना जीवन गमवावे लागले तरी मरेपर्यंत त्यावर अभ्यास करणारी डॉक्टर मेरी क्युरी, सुराज्यानिर्मितीसाठी पतीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राजगादी सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर, व्हीलचेअर वरती   असून सुद्धा “ Jindal saw Ltd. ” सांभाळून पहिली महिला उद्योजिका ठरलेल्या “स्मिणु जिंदाल”, देशासाठी पळणारी पी.टी.उषा आणि स्वत:च संपूर्ण बालपण कुस्तीसाठी त्यागून देणाऱ्या गीता आणि बबिता,या सर्वामध्ये एकच गोष्ट सारखी ती म्हणजे काय बनायचं हे त्यांनी निश्चित केल.यादेखील महिलाच पण यांनी संसार साम्भाळून त्यांनी बदलवल स्वताला घरातील प्रत्येकाला, ज्यांनी ऐकल त्यांच्या सोबत ज्यांनी नाही ऐकल त्यांच्या शिवाय जे मिळवायचं ते मिळवलं. अतूट श्रद्धा होती त्यांची स्वत:वर, म्हणूनच तर त्यांना सगळे कितीहि वाईट म्हटले, कितीही हस्ले तरीही अपयशात कधीही त्यांनी हार पत्करली नाही.
"सूर्य मावळत असताना सुद्धा त्यांना ती नव्या दिवसाची सुरुवात वाटायची, ज्या गुलाबाकडे बघून प्रेमकाव्य सुचाव त्या गुलाबाला  बघून त्याच्या कर्तुत्वातून -सुवास देण्याच्या वृत्तीतून समाजासाठी झिजण्याची प्रेरणा त्यांना मिळायची. ”
J D ANVIN च्या म्हणण्यानुसार “स्त्री हीच राष्ट्राच्या स्थितीसाठी जबाबदार असते” म्हणूनच तर स्वराज्यातील खंबीर असणारी जिजामाता विचारी असल्यानेच प्रत्येकाच्या स्वप्नातील स्वराज्य अस्तित्वात आले."स्त्री” जेव्हा लाचार बनते तेव्हा देशही लाचार बनतो....
कळत नकळत पश्च्यात्यांच्या  अनुकरनातून भारतीय नारी लाचार तर बनत नाहीये न ? HAIR STYLE च्या नादात LIFE STYLE तर विसरत नाहीये न? SELFI पायी स्वताची ओळख तर गमावणार नाही न? BEAUTY PARLOUR ने चेहरा साफ करता येईल पण मनाच काय?
आपल्यालाहि आता विचार करायला हव,विझणार्या तेजाला जागवायला हव,गती द्यावी त्या विचारचक्राला आणि थांबवावे त्या अविचाराला.....जरा  ठरवूया आपण येणाऱ्या पिढ्यांना काय देणार ?
“पाश्चात्यांचे अंध अनुकरण कि आपले ( भारतीय ) प्रेरणादायी जीवन .......?”

©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

विझणार ना कधी.....

हरणार ना कधी मी
थांबणार ना कधी
लागली जी आग आता
विझणार ना कधी //
अनंत येतील अडचणी
दुःखही असतील क्षणोक्षणी
संकटाना सामोरे जाऊन मी
थकणार  ना कधी //
सागरालाही पार करेल
हिमालयाला चूर्ण करेल
शत्रुच्या सामर्थ्याची चिंता मी
करणार ना कधी //
आयुष्याला आजमावण्यासाठी
स्वताला सिद्ध करण्यासाठी
सज्ज झालेला मी माघारी
फिरणार ना कधी //
स्वप्न बाळगून उराशी
झालोय निश्चयी मनाशी
स्वीकारलेल्या आव्हानांपासून
ढळणार ना कधी //

©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

उम्मीद....

उम्मीद....

जिंदगी की हर ख्वाईश तू पुरी कर
ख्वाईशौ की कभी नुमाईश ना कर

मिल जायेगी वह मंजिल तुझे
जो तेरी जान ले रही थी,
वही बन जायेगी जान तेरी
बस थोडा सब्र तो कर...

कडी मेहनत है करनी तुझे
पाना वही जीसकी तुझे आस थी,
आसमाँ भी झुक जायेगा निचे
बस थोडी कोशिश तो कर....

जीना तेरा यादगार बना दें
हर किसी को प्यार से अपनालें
प्यार से तू दुनिया जीत लेगा
बस थोडा हासील तो कर ...

युंही निकल जायेंगेे मुष्कीलभरे पल
हर अंधेरे के बाद सवेरा होगा कल
फिर जिंदगी में खुषहाली करेगी राज
बस थोडी उम्मीद तो कर......

©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

सजदे में तुम्हारे हमें झुकने दो....

जब से तेरा प्यार मिला है  शायद खुद को खो दिया है थोड़ा ही सही प्यार निभाने दो  सजदे में तुम्हारे हमें झुकने दो.... भरी आंखों से ...